उपविभागीय अधिकारी,डीवाय एसपी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-खैरवे-भडगांव येथील पुरूष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून ,सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून, अत्याचार करून गांवाची शांतता,कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणा-या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा,अशी मागणी खैरवे भडगांव येथील ग्रामस्थांनी केली आहे.मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसीलदार शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सारंगखेडा यांना दिले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश वळवी,संजय चौधरी,रामसिंग ठाकरे,मयाराम वाघ,विष्णू सोनवणे,करन सनेर आदि ७० पेक्षा अधिक महिला पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या गांवाचा वादग्रस्त पोलीस पाटील श्री.धनराज उत्तम पानपाटील हे गांवातील पुरूष व महिला रहिवाशांना कारण नसतांना वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण करीत आहेत. गांवातील शांतता बिघडवत आहेत.कायदा व सुवस्था बिडवण्याचे काम करत आहे.पोलीस पाटीलच्या अत्याचारामुळे आम्हा ग्रामस्थांना गांवात सुरक्षित वाटत नाही.पोलीस पाटील हा गांवातील पुरूष व महिलांशी वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण करून नेहमीच असभ्य वर्तन करतो.आम्हा ग्रामस्थांना गांवात लग्न समारंभ व सार्वजनिक ठिकाणी अपमानित करतो. गावाच्या पोलीस पाटीलवर आमचा विश्वास नाही.दिवसेंदिवस त्याचा अत्याचार वाढतच आहे.ग्रामस्थांना त्याचा अत्याचार असह्य झाला आहे.
खैरवे-भडगांव येथील पोलीस पाटील श्री.धनराज उत्तम पानपाटील यांनी गांवातील पुरूष व महिलांना कारण नसतांना वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण करून अत्याचार करीत आहे.दिवसेंदिवस ग्रामस्थांवर पोलीस पाटील कडून अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत.गांवाची शांतता ,कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत.ग्रामस्थांना गांवात सुरक्षित वाटत नाही.लग्नात व सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व मारहाण करून अपमानित करतो.ग्रामस्थांशी असभ्य वर्तन करतो.पोलीस पाटील वर आमचा ग्रामस्थांचा विश्वास नाही.म्हणून खैरवे- भडगांव येथील पोलीस पाटील श्री.धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे व त्यांच्या जागी सन्माननीय, सुशिक्षित, विश्वसनीय व्यक्ती ग्रामस्थांच्या सहमतीने पदावर नेमणूक करण्यात यावी.अशी मागणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या