चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-बहुजन समाज पार्टी आर्वी विधानसभा च्या वतीने आज दिनांक आर्वी तालुक्यातील गावातील एकलारा नांदपुर या गावातील बुद्धविहार निधी येऊनही बांधकाम सुरू झाले नाही व वर्धामनेरी गावातील रोड आणि नाल्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहे तसेच दलीत वस्तीकडे जाणारा रस्ता आजपर्यंत मुख्य रस्त्याला जोडलेले नाही नाल्याचे बांधकाम करताना लोकांच्या घराचे नळ पाणीपुरवठा पाइपलाइन तोड फोड केली ती पुन्हा दुरुस्त केली नाही या सर्व मागण्या करीता पंचायत समिती आर्वी येथील गटविकास अधिकारी मरस्कोल्हे यांना निवेदन बहुजन समाज पार्टी आर्वी विधानसभेचे कार्यकर्ते यांनी सादर केले यामध्ये गटविकास अधिकारी मरस्कोल्हे यांनी लवकरात लवकर मागण्या पूर्ण होईल याचे आश्वासन दिले निवेदन देताना कवडूजी मेश्राम मनोज माहोरे प्रमोद पखाले आर्वी विधानसभा अध्यक्ष प्रविण मनवर आमोल रंगारी विनोद पायले तालुकाअध्यक्ष,सुमित वाघमारे अजय दाभाडे गौतम मेश्राम मनवर प्रफुल ढोले श्रीधर कांबळे अक्षय भगत अनिकेत भगत संजय मेहरे उपस्थित होते


0 टिप्पण्या