Ticker

6/recent/ticker-posts

....साहेब, हाळी-हंडरगुळी येथील वाहतूकीस शिस्त लावणार कोण व कधी ...?

प्रशासनाची जाईना सुस्ती ; 
म्हणुन वाहनधारकांना आली मस्ती.!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर शहरानंतर तालुक्यामध्ये सर्वात मोठे व राज्यमार्गाशेजारी असलेल्या हाळी-हंडरगुळी या 2 गावातील मुख्य बाजार पेठ तसेच राज्य मार्ग येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.यात भर म्हणुन की काय,संबंधित यंञणेच्या नाकावर टिच्चून अल्पवयीन पोरं शर्यत लागल्या सारखे धूम स्टाईल गाड्या चालवतात.व बेशिस्तीत पार्क करतात.परिणामी छोटे,मोठे अपघात होतातच.!
म्हणुन याबद्दल अनेकदा आवाज उठवुनही यावर नियंञण ठेवणा-यांची सुस्ती कांही केल्या जात नसल्यामुळेच कांही वाहनधारकांना मस्ती आल्याचे बोलले जाते.
या दोन गावातून गेलेल्या राज्यमार्गालगत विविध शासकीय,निमशासकीय कार्यालये आहेत.म्हणुन विविध कामांसाठी हजारो नागरीकांची व वाहनांची येथे गर्दी असते.तसेच अनेकांनी सा.बां.खात्याच्या जागेवर अतिक्रमण करुन स्व:ताचे व्यवसाय थाटले आहेत.त्या पैकी अनेकांनी टेबल,खुर्च्या,बाकडे,कॅरेट्स असे साहित्य रोडवरच ठेवल्यामुळे तसेच बेशिस्तीत थांबलेल्या गाड्यांमुळे सतत ट्रॅफीक जॅम होत असते. यामुळे एखादा मोठा अपघात पण होऊ शकतो.म्हणुन याबद्दल अनेकदा पेपरबाजी केली तरी ही यंञणेची सुस्ती कांही जाईना.म्हणुन मस्ती आलेले कांहीजण वाहने कशीही पार्क करतात.
दरम्यान आठवडी बाजार दिवशी तर शेकडो गाड्या मेनरोड, जि.प.शाळा.पोलीस चौकी या व अन्य ठिकाणी रोडवरच पार्क करत असल्याचे दिसते.तरीही कारवाई शुन्यच..! 
यामागचे अर्थ व कारण कुणालाही समजले नाही.व कारवाई करणारेच बघ्याची भुमिका घेत असल्याने एखादा महाभयंकर मोठा अपघात झाल्यावरच यावर कारवाई करणार का ? 
——————————————————
कर्तबगार एस.पी.साहेब लक्ष घालतील का?
अल्पवयीन चालक,बेशिस्तीत पार्क केलेली वाहने,नंबर नसलेली व मुदत संपलेली वाहने तसेच 4,4 प्रवाशी बसवुन धूम स्टाईल धावणा-या बाईक्स अशा प्रकारे मोटार वाहन कायद्याची पायमल्ली होत असल्याचे बघूनही कार्यवाहीची डेअरींग न दाखवणारे प्रशासनातील लोकं ! यांच्यामुळे येथे कांही वाहनधारकांची मस्ती,मुजोरी वाढल्याचे दिसते. तसेच अशा वाहनांवर जिल्ह्यातील विविध ठाण्याच्या हद्दीत कारवाया होतात.परंतू हाळी हंडरगुळीतच का,होत नाहीत? का,हाळीहंडरगुळी लातुर जिल्ह्यात नाही,का?असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.म्हणुन कर्तबगार एस.पी.सोमय मुंडे हे तरी याकडे लक्ष घालतील का?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या