Ticker

6/recent/ticker-posts

बाप म्हणतो,मुलगा इंग्लिश मिडीयममध्ये हाय,९ वीच्या मुलाला मराठी वाचता येत नाय!

शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय; शाळा बदलून मिळावी,प्रकल्प अधिका-यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगांव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता ३ री तील विद्यार्थांच्या शाळा बदल करून मिळावी,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांना दिले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,आकाश तडवी,योगेश रावताळे,हिरालाल वळवी,प्रकाश गावित, मनिलाल गायकवाड, भास्कर गावित,कालूसिंग कोकणी,दिलीप गावित, अरूण भंडारी,गोपाल भोसले,राजू गावित, फिलीप गावित, प्रकाश रावताळे,राकेश वळवी,शिलवान कोकणी,विक्रम कोकणी
आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.     
                     ढोरजळगांव येथील शाळेत इयत्ता ३ री च्या शैक्षणिक, आरोग्य आणि इतर विविध प्रकारच्या समस्या बघायला मिळाल्या आहेत. विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती असमाधान आहे.इयत्ता ९ वीच्या विद्यार्थांना  मराठी वाचता येत नाही.म्हणून एकूण विद्यार्थी शाळेतून काढून घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थांचे पालक आपल्या विद्यार्थांना इतर शाळा बदल मिळावी,म्हणून मागणी करत आहेत. पालकांच्या विद्यार्थांच्या विविध समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी व पाठपुरावा करूनही विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगती, आरोग्य सुधारणा व इतर बदल झालेला दिसून येत नाही.म्हणून पालकांची तीव्र नाराजी आहे.सदर शाळेतून विद्यार्थांना अन्य शाळा बदलून द्यावी,म्हणून पालकांची  पूर्ण पणे सहमती आहे. शाळा बदलून मिळाली नाही तर पालक आपल्या विद्यार्थांना शाळेत पाठवणार नाहीत, अशी भूमिका घेत आहेत, म्हणून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगांव येथील शाळेऐवजी हस्ती पब्लिक स्कूल अन्ड जुनियर काॅलेज दोंडाईचा व आत्मामालिक इंग्लिश मिडीयम स्कूल पुरणगाव येवला येथील शाळा इयत्ता ३ री तील विद्यार्थांसाठी तात्काळ बदल करून मिळावी. अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेमार्फत पालकांनी प्रशासनाकडे केली आहे. 
         सरकार प्रती विद्यार्थांमागे एका वर्षाला दीड लाख रूपये शाळेला देते.तरी आदिवासी विद्यार्थांना सुविधा मिळत नाहीत.९ वीच्या मुलाला मराठी वाचता येत नसेल तर शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही.या शाळा फक्त पैशे कमावण्यासाठी सुरू केल्या आहेत, म्हणून अशा शाळा सरकारने बंद कराव्यात, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या