Ticker

6/recent/ticker-posts

नंदूरबार जिल्ह्य़ातील शाळा शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित; धान्य तात्काळ पुरवठा करण्याची बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ प्रारंभ झाल्यापासून  माहे जून २०२५ व माहे जुलै २०२५ चे   शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेत तात्काळ पुरवठा करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,बिलीचापडा शाखेचे हाना पटले,नारसिंग वसावे,कैलास पवार, शहादाचे सखाराम मोते आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 
                     शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत रोज मध्यान्ह भोजन दिले जाते. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ प्रारंभ झाल्यापासून माहे जून २०२५ पासून अद्याप नंदूरबार जिल्ह्य़ातील कोणत्याच शाळेत शालेय पोषण आहाराचे धान्य प्राप्त नाही.धान्य पुरवठा न केल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांवर उसनवार धान्य उपलब्ध करून विद्यार्थांना मध्यान्ह भोजन देण्यात मोठा बोजा येत आहे.तरी शाळेत इकडून तिकडून उसनवार धान्य जमवून शाळेत मध्यान्ह भोजन सुरू आहे.
                  शाळेतील विद्यार्थांची उपस्थिती वाढवण्यासाठी व आरोग्यासाठी शालेय पोषण आहार नियमित पणे मिळणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थांच्या आरोग्यासाठी नियमित पोषण आहारासोबतच  विद्यार्थांना अंडी सारखे पोष्टीक पदार्थ आठवड्यातून एक दिवस अंडी मिळणे आवश्यक आहे.पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थांना ४५० उष्मांक( कॅलरी),१२ ग्रॅम प्रथिनयुक्त (प्रथिने),तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांना ७००  उष्मांक (कॅलरी),२० प्रथिनयुक्त (प्रथिने) आहार दिला जातो.पोषण आहार योजनेंतर्गत एकुण १२ प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात हा पोषण आहार देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे.यात अंडा पूलावचा समावेश आहे.
                  जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या विद्यार्थांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते.त्यामुळे ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. आर्थिक परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थांच्या आरोग्यावरसुद्धा होतो.शालेय जीवनात त्यांचा शारिरीक,मानसिक व बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांना आहारातून आवश्यक प्रथिने मिळणे आवश्यक आहेत.तसेच नियमित सकस आहार मिळणे अत्यावश्यक आहे. 
                 काही शाळेत ३०० ते ४०० विद्यार्थी संख्या आहे.अशा शाळेत मुख्याध्यापक उसनवारीने किती दिवस विद्यार्थांना शालेय पोषण आहारात मध्यान्ह भोजन देतील? मुख्याध्यापकांवर मोठा बोजबारा निर्माण झाला आहे.म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील सर्वच शाळांत शाळा सुरू झाल्यापासून जून २०२५ पासून ते माहे जुलै २०२५ अखेर पर्यंत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य तात्काळ पुरवठा करण्यात यावा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या