Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसाने कुंभार वीटभट्टी धारकांचे अतोनात नुकसान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजी नगर :-संभाजीनगर, जालना जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्या पासून पडत आस्लेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायीकाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे  वीट भट्टी धारक कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत .

वीट भट्टी धारकाला दोन पैसे मिळण्याची वेळ मे -जून हे दोनच महिने आसते ,दिवाळी पासून सुरू  झालेल्या या धंद्याला माती ,मजूर ,जागाभाडे ,भुसा राख ,कोळसा ,वीज ,वाहतूक इत्यादी  फार मोठा खर्च आसतो तो भागवण्यासाठी खासगी सावकाराचे कर्ज आव्वच्या सव्वा टक्यांनी काढले जाते ,कारण या धंद्याला शासन दरबारी आथवा बँकेच्या दiरात  
कसलीही मदत मिळत नाहीं ,कीं कोणते ही कंपनी विमा कवच प्रदान करत नाहीं .स्वता च्या हिमतीवर पोट भरण्यासाठी करण्यात येत आस्लेल्या या  धंद्यावर आज फार मोठे  आस्मनि  संकट कोसळले आहे .
मे _जून महिन्यातच काम करून दोन पैसे मिळवून सावकाराची देणी परत करण्यासाठी धडपड चालू आसतानी यंदा अचानक मे महिन्याच्या सुरुवाती पासून पडत आस्लेल्या अवकाळी पाऊस वाऱ्या मुळे वीट व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाल्या मुळे हे भट्टी धारक 
कमालीचे कर्जबाजारी झाले आसून सावकाराची देणी देणे मुश्किल झाले आहे .या व्यवसायाला बँकेत कर्ज व स्वतंत्र विमा कवच  शाशनाने उपलब्ध करून द्यावे आशी मागणी कुंभार समाज करत आहे. 



चौकट
1)गणेश गाडेकर वीट व्यावसायिक  

वीटभट्टी धंदा हा आमचा जातिवंत धंदा आहे.परंतु आद्याप पर्यंत या व्यवसायाला विमा मिळत नाहीं हे फार मोठे दुर्दव आहे .तरी सरकारने या कडे लक्ष देवून ते मिळवून द्यावे. 

2)विजू पुर्भे  शिवसेना शहर प्रमुख  
पूर्वीपासून करत आलेल्या या व्यवसायाला अद्याप पर्यंत कोणत्याच बँकेत कर्ज मिळत नाहीं ही फार मोठी शोकांतिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या