मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : शेतक-याचे १०० टक्के कर्ज माफ करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,कैलास पवार, सुभाष पवार, रणजित पवार, सुनील पवार, सुरेश ठाकरे,माहरू सोनवणे,वेडू भील, आतील सोनवणे,चतुर मोरे,आप्पा कुवर, सुनिल मुसळदे, भाऊसाहेब भील, भुरा सोनवणे,जितेंद्र सोनवणे, प्रविण सोनवणे, सुनिल सोनवणे आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झाले आहेत. ज्वारी,बाजरी,मका,कांदा, भाजीपाला,फळबागा, कापूस, धान इत्यादी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वर्षभरात एकच पीक घेणा-या शेतक-यांची तर कठीण परिस्थिती आहे.बॅन्काकडून शेतकऱ्यांना कर्ज ही मिळत नाही .शेतकऱ्यांना सावकारांकडे उंबरठे झिजवावे लागत आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतक-यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती नेमू नका.शेतक-यांचा सातबारा कोरा करणे आवश्यक आहे.शेतक-याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शेतक-यांचे सर्व कर्ज माफ करणे गरजे आहे.म्हणून शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्ज माफ करावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून सरकारकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या