राजेश येसेकर भद्रावती
भद्रावती :-जेव्हा एखाद्या राजकीय पक्ष किंवा उमेदवार आगामी निवडणूकीत मतदारांना प्रलोभन देऊन पैसे देतो,व मतदारा आपले अमूल्य मत विकण्याचा विचार करतो तर. हे चुकीचे आहे कारन मतदार करणे म्हणजे लोकशाहीला बळकट करणे होय.
ज्या उमेदवारांनी सामान्य जनतेसाठी शिक्षण,आरोग्य, रोजगार,रस्ते व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या व आपले प्रश्न मार्गी लावतात,त्यांनाच मत केले पाहिजे.
जर आपण आपले मत पैसेसाठी अयोग्य उमेदवारांना निवडून आणले तर सर्व सुविधान पासून वंचित राहू!आपल्यासाठी व येणाऱ्या पिढीसाठी ते खूप वाईट आहे व सुविधा होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलातर होतात. म्हणूनच जो करेल काम त्यांनाच मत असे धोरण राखून लोकशाही बळकट करावी. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त मतदान करावे , मतदान करने हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या