चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :ऑगस्ट क्रांती दिन व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची चेतना रुजविण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धा इयत्ता पाचवी ते नववी मध्ये वर्गनिहाय घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी साजेसा असा पारंपरिक वेश परिधान करून आपली कला सादर केली. या स्पर्धेत एकूण ६० स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला.
देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्यासाठी चित्रकला विभागाने मनमोहक असा रंगमंच तयार केला होता.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो, जहाँ डाल-डाल पर, ए मेरे वतन के लोगो, मेरा कर्मा तू , ए वतन, ए वतन, जय जय महाराष्ट्र माझा, सारे जहाँ से अच्छा अशी रोमहर्षक देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांची मने देशभक्तीने प्रफुल्लित केली. स्पर्धकांच्या सुरेल गीतांना विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्य वृंदने संगीताची साथ दिली.
या स्पर्धेत इयत्ता ७ वी प्रथम, इ. ६ वी द्वितीय तर इ. ८ वी वर्गाने तृतीय क्रमांक मिळविला. याचे परीक्षण संगीत विशारद अजिंक्य नवगिरे व पर्यवेक्षक सुजित कांबळे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अमोल फुले सर यांनी ९ ऑगस्ट क्रांती दिन व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. तसेच पुढील वर्षी या स्पर्धा वर्गवार घेऊन भरघोस बक्षिसे देण्यात येतील असे जाहीर केले.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री दत्तात्रय घंटे पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, कल्पना शिंदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगीत विभागाचे सुहास पवार यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब झांबरे यांनी केले. स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडण्यासाठी सर्वांनी मोलाचे परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या