Ticker

6/recent/ticker-posts

श्री. प्रकाश पोळ गटविकास अधिकारी पं. स. जामखेड यांना सेवानिलंबीत करुन फौजदारी गुन्हा दाखल करा :- श्री. आप्पा ढगे...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

जामखेड - जामखेड तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक विहिरी मंजूरी कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. सदर वैयक्तिक लाभाच्या योजनांची मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. अहमदनगर यांच्या पथकाने चौकशी केलेली आहे. चौकशीत दोषी आढळल्यामुळे श्री. प्रकाश पोळ यांना सी. ई. ओ. अहमदनगर यांनी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. यासाठी मी पुढील मागण्यांसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयासमोर दि. २६/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. अमरण उपोषण्याचा इशारा श्री. आप्पा ढगे यांनी दिला आहे. त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
१. मा. सी. ई. ओ. अहमदनगर यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत श्री. प्रकाश पोळ गटविकास अधिकारी पं. स. जामखेड हे दोषी आढळल्यामुळे त्यांना त्वरीत सेवानिलंबीत करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा.
२. सदरची कारवाई / चौकशी कोण दाबत आहे? त्या अधिकाऱ्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
३. दि.२८/०७/२०४ रोजी मी (आप्पा रमेश ढगे) बीड रोड जामखेड रस्त्याने जात असतांना प्रकाश पोळ यांची रस्त्याला भेट झाली असता तुझ्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे तुझे काम व्हायचे असेल तर मला आणखी एक लाख रुपये दे अशी मागणी केली याचीही चौकशी करण्यात यावी.
४. काही विहिरी मशिनच्या साहयाने केल्या आहेत.
5. ५. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली आहे. त्याची पोलिसांमार्फत चौकशी करावी.
६. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची पं. स. जामखेड मधील अधिकारी, कर्मचारी यांचेवर प्रचंड दहशत असून सर्वजण दबावाखाली काम करीत आहेत. त्यांनी अनेक ग्रामसेवकांना, शिक्षकांना निलंबित केले आहे.
७. माझे व मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर यांचे अतिशय चांगले संबंध आहे. कर्जत, जामखेड मधल दोन्ही आमदार माझे ऐकतात त्यामुळे माझे कोणीच वाकडे करु शकत नाही अशी दादागिरीची भाषा करतात. याची चौकशी व्हावी. ८. मीच मोठा व मलाच सर्व कळते अशी मगरुरपणाची भाषा वापरुन भेटायला गेलेल्या शेतकऱ्याला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात.
९. सर्व शासकीय योजना मीच आणल्या आहेत अशी उपकाराची भाषा करतात व मी पणाचा आव आणत आहेत. खर तर ते जनतेचे व शासनाने नोकर आहेत.
१०. श्री. प्रकाश पोळ यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील शेतकऱ्यांच्या लाभाची योजना, आर्थिक बाबी, प्रशासकीय कामकाज आदिंची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  
आदी मागण्यांचे निवेदन त्यांनी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन, मा. पालक मंत्री अहमदनगर, मा. जिल्हाधिकारी अहमदनगर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, मा. तहसिलदार जामखेड यांना मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या