Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीचा आड अतिक्रमणात ..!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे जुन्या काळातील सार्वजनिक वास्तू असलेला पाण्याचा "आड" कांही लोकांनी केलेल्या अतिक्रमनामध्ये अडकला आहे.म्हणुन याबाबत चर्चा केलो असता त्या लोकांना आडावर केलेले अतिक्रमण काढण्यास भाग पाडणार आहे.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर यांनी दिली आहे.
70/80 च्या दशकात गावोगावी पिण्यासह सांडावांडीचे पाणी ग्रा.पं. च्या मालकीचे असलेल्या आडातूनच मिळायचे.आणि सोलला बांधलेला पोहरा / घागर आडात सोडून पाणी शेंदायचे.अशा प्रकारचे 3 आड येथे होते.आज या 3 आडाची दुरावस्था झाल्याचे दिसत आहे.कारण गल्लो- गल्ली नळ आले.आणि त्यातुन पाणी येऊ लागल्याने सार्वजनिक असलेले पाण्याचे आड दुर्लक्षित झाले.तसेच आडात पाणी असलेतरीही त्यात त्या परिसरातील कांहीजणांनी घरातील वेस्टेज साहित्य {केर,कचरा,कपडे } यासारख्या वस्तू टाकल्याने आडाचे सौंदर्य व त्यातील पाणी वाया गेले.  तर हंडरगुळीच्या सरपंच,उपसरपंच  यांचा वार्ड असलेल्या जुनी बाजार गल्लीतील सार्वजनिक झालेली दुरवस्था बघून परिसरातील लहान मुलांसह गुराढोरांचे जीव धोक्यात येऊ नये,म्हणुन ग्रा.पं.प्रशासनाने या आडाभोवती तारेचे कुंपन बसविले. ते कुंपन तोडून त्या आडावर कांही लोकांनी जळतण ठेवले.तर कांहींनी कुंपनाच्या तारेचा वापर हा धुतलेले कपडे वाळू घालण्यासाठी करीत आहेत.हे एक प्रकारे आडावर ताबा मिळविण्याचा प्रकार म्हणावा लागेल  याबाबत आडावरचा त्या लोकांनी मिळवलेला कब्जा/ताबा हटवुन या आडाची स्वच्छता करुन आडातल्या घाण पाण्याचा उपसा करावा,अशी वार्ड 2 मधील जनतेची मागणी आहे.

आडावर केलेले अतिक्रमण त्वरीत काढण्यास भाग पाडणार आहे.आणि आडाची स्वच्छता (आड क्लिन) करण्याची योजना असेलतर संबंधित विभागाकडून आडाची स्वच्छता करु आणि या आडातील घाण पाण्याचा उपसा करुन या आडातील पाणी वापर करण्यायोग्य स्वच्छ केले जाईल. अशी माहिती सरपंच विजय अंबेकर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या