Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय जमिनीवर घरे बांधून अतिक्रमण धारकांना नोटीसा न देण्याची वंचित बहुजन आघाडीची विभागीय आयुक्तांकडे मागणी


विभागीय उपायुक्त यांचे समाधानकारक उत्तर शासनाला कळविण्याचे आश्वासन 


प्रतिनिधी चित्रा न्युज
औरंगाबाद - औरंगाबाद पश्चिम तालुक्यातील शरणापुर येथील किमान २०० ते २५०  शासकीय गायरान जमीन गट नंबर १ व २ मधील अतिक्रमण धारकांना अप्पर तहसीलदार औरंगाबाद यांनी अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. या विषयी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज विविध कार्यलयात निवेदन देण्यात आले.
 यावेळी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अँड .बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन राज्यातील गायरान जमीनीवर असलेल्या अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यांत येऊ नये, अशी भुमिका घेतली होती. 

 यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोटिसा देणार नाही असा शब्द देऊन ही नोटिस बजावल्या जात आहे. याकडे अप्पर तहसीलदार हे दौऱ्यावर असल्याने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आहेत, असे सांगितल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आवक शाखेत निवेदन दिले, तर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून उपायुक्त महसूल यांना भेटून निवेदन दिले. 
 सविस्तर चर्चा केली त्यांवर सदरील निवेदन व आपल्या भावना शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष अंजन साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा सदस्य पी के दाभाडे, तालुका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष सतीश महापूरे, तालुका कोषाध्यक्ष सुगंध दाभाडे, जिल्हा कार्यकारिणी संघटक हरिदास बोर्डे, तालुका संघटक अशोक त्रिभुवन, रविकुमार रत्नपारखे, आदींसह शरणापुर येथील अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या