चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही देशभरातील बौद्धांची न्याय्य मागणी आहे.त्यासाठी बिहार सरकार ने महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करावा आणि महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये सर्वच्या सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत या मागणी साठी येत्या दि.28 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात मुंबई आणि ठाण्यातील सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने सामील होऊन बौद्धांची ताकद दाखवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या आयोजित बैठकीत ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विचारमंचावर रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे; महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; प्रकाश मोरे; एम एस नंदा; विवेक पवार; महिला आणि युवक आघाडी चे प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.
0 टिप्पण्या