चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-उदगीर तालुक्यातील हाळीहंडरगुळी ही 2 जुळी गावे तशी खुप शिस्तप्रिय व शांतताप्रिय.
परंतू,गत कांही दिवसापासून हाळी - हंडरगुळीतील शिस्त व शांतता कधी पण धोक्यात येऊ शकते,अशी चर्चा व्यापा-यांसह जाणकार जनतेमध्ये होत आहे.व याला कारण म्हणजे या 2 गावच्या मार्केट मध्ये व राज्यमार्गा वर तसेच अनेकांच्या दुकाणासमोर बेशिस्तीत उभा असलेल्या लहान - मोठ्या गाड्या (वाहने) आणि याला खतपाणी घालणारे प्रशासन.हेच भविष्यात होणा-या "ब्लास्ट" ला (वादावादीला) जबाबदार असतील. कारण,शांतता समितीच्या प्रत्येक बैठकीत बेशिस्त वाहतूकीला शिस्त लावणार,प्रसंगी त्यावर नियमाप्रमाणे कारवाई करणार.असे म्हणणारे सं. अधिकारी हा सगळा बेशिस्तपणा उघड्या डोळ्यांनी बघतात. कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे धाडस होईना,म्हणुनच तर हंडरगुळी हाळी येथे वाहनधारकांचा मुजोरपणा व बेशिस्तपणा वाढला आहे.या दोन जुळ्या गावांना भावी तालुका म्हटले
तर ते चूक नाही कारण,मोठी बाजार पेठ व मोठी जनसंख्या हंडरगुळी व हाळी या 2 जुळ्या गावांची आहे. तसेच हे 2 गावांना शांतता व शिस्त प्रिय गाव म्हणुन ही प्रशासनदरबारी ओळखले जाते.परंतू,या ओळखीला काळीमा फासण्याचे काम गत कांही महिण्यापासून अल्पवयीन व कांही सज्ञान वाहनधारक करीत आहेत..! याचे कारण,कारवाईचे धाडस कुनी पण करीत नसल्याने राज्यमार्गावर तसेच मार्केट मध्ये वाहतूकीचे सगळे नियम पायदळी तुडवून अल्पवयीन तसेच सज्ञान वाहनधारकांकडून या ठिकाणी वाहनांची कशीही पार्किंग केली जाते.यामुळे पदचा-यांना व अन्य वाहनांना ये-जा करताना खुप ञास सहन करावा लागत असल्याने अनेकदा छोटे-मोठे वाद झालेत.तरी येथील बेशिस्त वाहनधारकांवर दंड वा नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे "धाडस" प्रशासन दाखविणार कधी? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..
0 टिप्पण्या