आमदार बनतील का कामदार? रुग्णांचे आरोग्य रामजाने
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-कधीकाळी मदर पीएचसी म्हणुन ओळखले जाणा-या हंडरगुळी (ता.उदगीर) येथील सरकारी {प्रा.आ.केंद्र} दवाखान्यात सतत 5 वैद्यकीय अधिकारी कायमस्वरुपी मुक्कामी थांबायचे.आणि 1980 ते 2000 पर्यंत येथील सरकारी दवाखाण्यातील कारभारावर ग्रा.पं. च्या तत्कालीन सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा आदरयुक्त दबदबा,वाॅच होता.असे जर आज/आता कुणाला सांगितले तर हे अनेकांना विशेषत: आजच्या युवकांना खरे वाटणार नाही.पण हे सगळे तंतोतंत खरं (सत्य) आहे.तसेच हे पण सत्य आहे की,आजच्या घडीला या दवाखान्या मध्ये फक्त दोन डाॅक्टर आहेत.ते पण "बाॅन्डींग" म्हणजे कायमस्वरुपी नव्हे तर 11 / 11 महिण्याच्या करारावर ! यामुळे हंडरगुळीसह परिसरातील गोर-गरीब,मध्यमवर्गीय जनतेच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच या बाबत आवाज उठवुनही याकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणुन हजारो रुग्णांचे आरोग्य "राम जाने" म्हणजे "राम" भरोसे बनले असलेतरीही गरीब जनतेच्या जीवन मरणाशी निगडीत असलेली ही समस्या "गरीबांचा दाता" बनलेले आमदार संजय बनसोडे हे कामदार बनुन सोडवतील का,आणि सरकारी दवाखाना हंडरगुळी येथे 5 नाही,तर किमान दोन कायमस्वरुपी डाॅक्टरची नियुक्ती करतील का?
उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे तसेच राज्यमार्गालगत असलेले आणि गुरांच्या बाजारासाठी देशाच्या अनेक राज्यात प्रसिध्द असलेल्या हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज 150 ते 175 रुग्ण येत, तसेच आठवडी बाजारदिनी 200 ते 250 रुग्णांची ओपीडी असते.तसेच आयपीडी करीता रोज अनेक गरीब रुग्ण अडमिट होतात. हंडरगुळी हे चार तालुक्याचे "सेंटर पाॅईंट" आहे. या दवाखाण्यात शस्ञक्रियेसाठी महिलांसह अपघात झालेले व साप- विंजू चावलेले आणि विष पिलेले रुग्ण राञी-बेराञी येथे येतात.माञ येथे चुकून कधीतरी 1 डाॅक्टर मुक्कामी असतो.कर्मचा-यांची तर बातच अलग.कारण कुणाचा ही "वाॅच" नसल्याने तसेच कित्येक वर्षापासून येथे नोकरी करणारे तीन जेंन्टस (पुरुष) कर्मचारी हे मनामध्ये येईल तेंव्हा ये-जा करीत असल्याचे दिसतात.व हा भोंगळ व मनमानी कारभार वरीष्ठ अधिका-यांना माहित असून ही ते या गंभीर व गरीबांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या या सर्व समस्यांकडे कानाडोळा करीत आहेत.असा दाट संशय येतोय..
वेळ सकाळी 9 ची आणि येतात 10/11वा असा प्रकार हंडरगुळी येथील सरकारी दवाखान्यातील नोकरदारांच्या बाबतीत रोज घडत असतो.तरीही वरीष्ठांनी अद्याप कांही कारवाई का केली नाही? दस्तूरखुद अनेकदा डाॅक्टरच वेळेवर येत नाही! म्हणुन मग कर्मचारी तरी वेळ कशी पाळतील,बरं!!
येथे कायमस्वरुपी डाॅक्टर व रुग्णांना अॅंम्बुलन्स {वाहन} राहत नसल्याने रुग्णांना छोट्या-मोठ्या उपचारास तालुका किंवा जिल्हा गाठावा लागत आहे.ते पण भाड्याच्या गाडीनेच..! त्यामुळे प्रशासनाने त्वरीत वरील सर्व बाबींची दखल घ्यावी तसेच माजी मंञी आ.संजय बनसोडे यांनी पण चालू टर्मला तरी याबाबत कामदार बनावे आणि येथे कायमस्वरुपी एम. ओ. (मेडीकल आॅफीसर} ची त्वरीत नेमणुक करावी आणि जुन्या व मुजोर बनलेल्या त्या दोन पुरुष कर्मचा-यांची बदली करावी,अशी मागणी रुग्णांसह सामान्य जनतेतून होत आहे.रुग्णवाहिका उप्लब्ध नसते तेंव्हा रुग्णाला उदगीर किंवा लातुर येथे घेऊन जायला आलेली भाड्याची कार दिसत आहे
0 टिप्पण्या