रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
परभणी : - स्त्री ही कोणत्याही जाती धर्माची असो तिला शतकानूशतके गुलामीचे जीवन जगावे लागले. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे स्रियांना मुक्ती मिळाली असे प्रतिपादन सुनीता साळवे,जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन महिला आघाडी,परभणी यांनी केले.
25 डिसेंबर रोजी वंचित बहुजन महिला आघाडी,परभणीच्यावतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषण करतांना त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, स्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला रोखण्यासाठी कौटूंबिक जबाबदारी सांभाळून स्रियांनी बाहेर पडून काम करावे. परिषदेत ऍड पुष्पा उबाळे यांचे व्याख्यान झाले. प्रा सुरेश शेळके, डॉ धर्मराज चव्हाण, धम्मपाल सोनटक्के, यशवंत मकरंद, प्रमोद कुटे, माया कांबळे यांचे शुभेच्छापर मनोगत झाले.
यावेळी टी.डी. रुमाले, सचिन गंगाखेडकर, सुमित भालेराव, माला साळवे, सविता सोनटक्के, मंदाकिनी राठोड, ऍड सिमादेवी भुतकर, मालती मोरे, जयश्री रोडे, उर्मिला मस्के, सुजाता सोनटक्के ,फुलाबाई तुपसमुंद्रे, अनिता घुगे, सरुबाई कांबळे, रेखा पंडित, डिगांबर घुगे, तुकाराम भारती, तुषार गायकवाड, संदीप खाडे, भाऊसाहेब गुळवे,सिध्दोदन सावंत ,राजेंद्र भूतकर, मधुकर कठाले यांची उपस्थिती होती. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवार सीताबाई गिरी, सरपंच ग्रामपंचायत सोनूला, बंडू नवघरे, सदस्य ग्रामपंचायत असेगाव, पवन कांबळे सदस्य ग्रामपंचायत बाभळगाव यांचा परिषदेत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगलताई गुट्टे यांनी केले तर प्रास्ताविक ऍड प्रतिमा चंद्रमोरे यांनी केले. आभार प्रदर्शन रसिकाताई सावंत यांनी केले. परिषदेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या