Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा जिल्ह्यास लाभले बाबासाहेबांचे पदस्पर्श केवळ आठवणीतच राहिले

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदाच भंडारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भंडारा येथे आले होते. में महिन्याच्या भर उन्हात लोकसभेच्या निवडणुकी साठी डॉ बाबासाहेब यांनी शेड्युल्ड काश्ट फेडरेशन मार्फत उमेदवारी. दाखल केली होती.मतदार संघ पिंजून काढल्यानंतर विश्रामांचे ठिकाण निश्चित झाले होते.भंडारा येथील रेल्वे स्टेशन वरील डॉ कोलते यांच्या वाड्यात मुक्काम करायचे त्यांनी ठरविले होते.
भंडारा शहराला लाभलेला बाबासाहेबांचा पदस्पर्श व सहवास भांडारेकरांसाठी चिरंतन आठवणीत राहणारा आहे. डॉ.आंबेडकर प्रचारावरून थकून आल्यावर माईसाहेब जेवणावळी करायचे,जेवणासाठी समोर असलेल्या साहू यांच्या बंगल्यातील डायनिंग टेबल आणून त्यांना जेवण वाढायचे .तो टेबल आज ही  बंगल्यात सुरक्षित आहे.त्यांच्या सोबत स्थानिक कार्यकर्ते नारायणराव फुले,सुखलाल दहिवले,भानुदास बंसोड,दिनकर रहाटे ई.कार्यकर्त्यांचा ताफा राहायचा त्यावेळी वाड्यात रेलचेल चांगलीच वाढली होतील.
21 एप्रिल 1954 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नागपूरहून निवडणूक प्रचारा साठी भंडारा येथे आले होते. सायं.6.00 वा.नवतलावा शेजारी असलेल्या विस्तीर्ण (आजचा दसरा मैदान), प्रचार सभेला उपस्थित झाले.सभास्थानी *आंबेडकर जिंदाबाद,आंबेडकर आमचा राजा आहे*अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले होते.प्रचार सभे च्या प्रारंभी भजनाचा कार्यक्रम झाला.बाबासाहेब सोबत माई साहेब आंबेडकर,फेडरेशन चे सरचिटणीस राजाभोज,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,कांबळे, गायकवाड,दशरथ पाटील,आवळे,कामठी चे ना. ह.कुंभारे,निनावे वकील,भाऊसाहेब दलाल, ई.मंडळी होती व्यासपीठावर होती सभेला सुमारे 2लाख नागरिक उपस्थित होते.जवळपास दीड तास त्यांचे भाषण झाले.पवनी येथे प्रचार सभेला जात असताना येथील त्रिमूर्ती चौकात ते 2 मिनिटे थांबले होते.त्यांच्या पद स्पर्शाची आठवण आज ही मोठ्या अभिमानाने सांगतात.भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर,जवळच्या बाम्हणी ,देव्हाडी येथे ते आले होते. देव्हाडी येथील रेल्वेच्या तलावातील मोकळ्या जागेत सायं.त्यांची जंगी प्रचार सभा झाली व 9 मिनिटे भाषण केले,समता,न्याय व शिक्षणावर त्यांनी मार्गदर्शन केले.
बाबासाहेबांचे 6डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झाले तेव्हा पवनी येथे त्यांच्या अस्थी डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती संगमरवरी पुतळ्या खाली सुरक्षित ठेवण्यात आली. पुतळा उभारण्यासाठी चौथरा बंनवित असताना पीठूजी राऊत यांनी त्यांचेकडील अस्थी पुतळ्याखाली ठेवण्याची विनंती केली  26 नोव्हेंबर 1962 ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.अस्थी सुरक्षित असलेला बाबा साहेबांचा हा एकमेव पुतळा पवनीत असावा.
निवडणुकीच्या काळात जिथे बाबासाहेब मुक्कामाला होते त्या निवासस्थानाचे माहात्म्य भंडारे करांना नंतरच्या काळात जपता आला नाही.निवडणुकीनंतर काही दिवसानंतर डॉ.कोलते नी हा बंगला अशोक लेलँड कंपनीला विकला.बाबा साहेबांच्या शिल्लक असलेल्या उर्वरित आठवणीही पुसल्या गेल्यात. डॉ आंबेडकर जेव्हा_जेव्हा नागपूरला यायचे डॉ कोलते व राहाटे यांच्या घरी जेवलेल्या मासोळीचां रस्सा व भाकरीची आठवण ताजी करून द्यायचे.आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत.संपूर्ण जगात प्रसिद्ध भारतरत्न बाबासाहेबांचे भंडारा येथे वास्तव्य होते,भंडारा शहरास त्यांचे पवित्र पदस्पर्श लाभले ,दसरा मैदान येथे मोठी ऐतिहासिक सभा गाजविली पण त्यांचे इथे स्मारक किंवा स्मृती भवन नावाची वास्तू नाही,विदेशात लंडन मध्ये बाबासाहेब ज्या घरात वास्तव्यास होते, ते घर महाराष्ट्र सरकार ने विकत घेतले व  मोठा गाजावाजा करून कोट्यावधी रुपयांची तरतूद करून एक मोठी वास्तू, वारसा स्थळ घोषित केले.परंतु डॉ कोलते यांच्या मुक्कामी वाड्यास विकत घेवून वास्तूला ,दसरा मैदान येथे त्यांचां भाषणांच आठवणी वारसा स्थळ म्हणून राष्ट्रीय स्मारक घोषित करून शासन आणि बौद्धवासियांना का जपता आला नाही,ही एक मोठी शोकांतिकाच आहे.वेळोवेळी कार्यक्रम, मोर्चे, रैली काढण्या पेक्षा पुन्हा नव्या दमाने खऱ्या प्रयत्नांची गरज आहे.


२२/०१/१९४७ ला अकोला येथे झालेल्या सभेत मडामे साहेबांचे आजोबा स्व.लाकडूजी नारायणराव मडामे २) डॉ. बाबासाहेब सोबत दिसत आहेत( ते कोषाध्यक्ष _ शेड्युल कास्ट फेडरेशन (व्हराड)पदावर कार्यरत होते)

मो.सईद शेख,संस्थापक/अध्यक्ष
(ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन,भंडारा)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या