चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समता, बंधुता आणि न्याय यांचा मूलमंत्र देणारे थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, आणि सामाजिक क्रांतीचे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! करत ओबीसी क्रांती मोर्चा च्या वतीने आज जयंती साजरी करण्यात आली.
बाबासाहेबांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा मोठा लढा उभारला. शिक्षण, स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि अधिकार यांचा मंत्र देत त्यांनी वंचित, शोषित, दलित समाजाला नवा आत्मविश्वास दिला. त्यांच्या विचारांनी आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा दिली आहे.
आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांचे कार्य आणि विचार आत्मसात करून, समतामूलक समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध होऊया, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" — या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीचा जागर आपण सदैव करूया! असे वक्तव्य
ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी व्यक्त केले आहे. यावेळी
अमित वैद्य, संदीप मारबते ,सागर वैद्य ,अजय मेश्राम साहिल हुमने ,कपिल गजभिये,संजय वाघमारे, यशवंत सुर्यवंशी, रोशन जांभुळकर,जीवन भजनकर विलास साकुरे,रवी वाढही मनिषा भांडारकर, ज्योती मलोडे उपस्थित होते ।
0 टिप्पण्या