Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर शहरातील गणेशवाडी, नेहरूनगर , राॅयलनगर , व मुजिबनगर मध्ये भीषण पाणी टंचाई .....


पाणी देता का हो पाणी साहेब गणेशवाडी येथील नागरीकांची नगरपंचायत च्या अधिकार्यांना  केविलवाणी प्रश्न.... 
 
नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करणार.... बालाजी ढोणे ( महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ) 


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड 
 
नांदेड:-हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 4 मध्ये गणेशवाडी, राॅयलनगर, मुजिबनगर चा समावेश आसल्याने येथील नागरीकांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथे भीषण पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा नगरपंचायत पाणी पुरवठा विभागात खेटे घालून देखील नगरपंचायत चे मुख्य अधिकारी साहेब या कडे दुर्लक्ष करून नागरीकांना पाणीपुरवठा करत नाही असे नागरिकातुन बोलल्या जात आहे. मागील काळात शासनाकडून आलेल्या कोट्यावधी रुपयाचा खर्च पाणी पुरवठ्यासाठी नगरपंचायत यांच्या कडून दाखवण्यात आला पण याचा पाणी पुरवठा या साठी या योजनेत खर्च केला का आणी केला तर मग पाणी कुठ गेले या संभ्रमात येथील नागरीक आहेत. यावर तत्काळ नगरपंचायत प्रशासनाने लक्ष न दिल्यास येत्या 19 /5/ 2025 रोजी लोकशाही मार्गाने बेमुदत अमरण उपोषण करणार असल्याचे गणेशवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढोणे यांनी नगरपंचायत प्रशासनास लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. या काळात काही अनुसूचित घटना घडल्यास याला संपूर्ण नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आसा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या