चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-गरज नसताना मे महिण्यात जवळपास १५ दिवस अवकाळी पाऊस पडल्यामुळे तसेच दि.८,९ व १२ जुन रोजी मोसमी पाऊस पडल्यामुळे जमिनीत खोलवर ओलावा निर्माण झाला होता.त्या ओलाव्यासह निर्सगावर भरवसा ठेऊन हाळी व हंडरगुळी व परिसरातील सुकणी,रुद्रवाडी,खरबवाडी,
मोरतळवाडी,आढळवाडी,वाढवणा खूर्द,चिमाचीवाडी,
गादेवाडी.वडगाव,शेळगाव,टाकळगाव,चिद्रेवाडी गावातील शेतक-यांनी खरीप हंगामातील सोयाबीन,तूर,मुग,उडीद,तीळ व इतर पिकांची पेरणी करुन एकप्रकारे मटका च खेळला आहे.
आणि चांगली ओल असलेल्या जमिनीच्या उदरातून वरील पीके उगवत असल्याचे दिसत आहे.परंतू १३ जून पासून हाळी व परिसरात पावसाऐवजी राञंदिवस कुंभारी वारे सुटल्यामुळे खरीप हंगाम उभारी घेईल का? व खरीपात खेळलेला मटका
{पेरलेले बि,बियाणे हाती} लागेल का? याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
आजकाल शेतीत गुंतवणूक करणे म्हणजे मटका जुगारात
गुंतवणूक केल्यासारखेच आहे.
कारण,खेळलेल्या ९ आकड्याऐवजी दहावाच आकडा मटक्यात लागतो.आणि ९ आकड्यात केलेली गुंतवणूक वाया जाते.अगदी कांहीअंशी अशीच गत शेतीची आहे.म्हणजे
जेंव्हा-जेंव्हा पिकांची उगवण चांगली होते.तेंव्हा ती सर्व पिके
काढणीला येताच पावसाचा मारा सुरु होतो,आणि हाताशी आलेले सगळं शेत वाया जाते,म्हणुन शेती व्यवसाय हा एक प्रकारचा जुगारच आहे.असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
आणि सध्या अशीच गत पेरलेल्यांवर आली आहे.
जमिनीतील ओलावा व निर्सगराजा याच्यावर भरवसा ठेवुन
बहूतांश बळीराजांनी पेरणी केली.पण गत ८,९ दिवसापासून
पावसाऐवजी कुंभारी वारेच घोंगावत असल्यामुळे खरीप हंगाम उभारी घेणार का?याकडे शेतक-यांसह सामान्यजनांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या