राळेगणसिद्धी, 15 ऑक्टोबर 2025:
देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या कार्याचे कौतुक करताना म्हटलं की —
> “शरद पवळे हे माझ्या गावाच्या शेजारील नारायणगव्हाणचे असून ते माझ्याकडे नेहमी येतात. हा कार्यकर्ता निस्वार्थी आहे. आपल्या स्वतःच्या शेतरस्त्याच्या संघर्षातून त्याने प्रेरणा घेतली आणि शिव-पाणंद शेतरस्ते चळवळ सुरू केली. आज ही चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली असून शासनालाही याची दखल घ्यावी लागली आहे.
चित्रा न्युज प्रतिनिधी
अहमदनगर :- कुणालाही न सुचलेला हा विषय त्यांनी घेतला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचा मार्ग खुला केला. त्यामुळे मला खात्री आहे की हे कार्य आता देशभर पोहोचेल. चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे.”
अण्णा हजारे यांनी या प्रसंगी शरद पवळे यांच्या नेतृत्वाखालील शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचं कार्य “राष्ट्रीय पातळीवर नेण्याची क्षमता असलेलं” असल्याचं सांगून शुभेच्छा दिल्या.
एका शिवरस्त्यावरून सुरू झालेली चळवळ – आता राज्यव्यापी!
नारायणगव्हाण या छोट्याशा गावातून सुरू झालेली शिव पाणंद शेतरस्ता चळवळ आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली आहे.
सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी “शेत तिथे रस्ता – गाव तिथे समृद्धी” या मंत्राखाली प्रशासकीय, न्यायालयीन आणि लोकआंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे –
शेतरस्त्यांची मोजणी व संरक्षण मोफत करण्यात आले,
९० दिवसांत रस्ता देण्याचे आदेश शासनाने जारी केले,
आणि आता राज्यभर शेतरस्त्यांना क्रमांक व सीमांकन प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चळवळीचा ध्यास – प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता!
अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांवरील “पेरू वाटप आंदोलन” आणि सततच्या प्रशासनिक पाठपुराव्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे.
शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता आता देशभर विस्तारण्याच्या मार्गावर आहे.
राळेगणसिद्धीचा संदेश:
> “शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यांसाठी लढा देणं म्हणजे देशाच्या अन्नदात्याचा सन्मान करणं. शिव पाणंद शेतरस्ता चळवळ ही खरी ग्रामविकासाची वाट आहे.”
— अण्णा हजारे


0 टिप्पण्या