Ticker

6/recent/ticker-posts

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिकांची नव्याने प्रभाग रचना होणार; नगरविकास विभागाचे आदेश

चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

मुंबई : मागील काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपैकी बहुप्रतीक्षित महापालिकेच्या निवडणुका अद्यापपर्यंत रखडल्या असल्याने, याबाबतीत नेमक्या तारखांची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निश्चित होणार आहे. पुढील आठवड्यात याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या प्रकरणाला राजकीय नाट्यमय वळण आले असून, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून नुकताच राज्यातील २४ महापालिकांच्या नव्याने प्रभाग रचनेचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावणार आहे, कारण या आदेशानंतर महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या