सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी बोंडार येथे झालेल्या अक्षय भालेराव याचा निघून हत्येतील मारेकऱ्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केली. अक्षय भालेराव या तरुणाने गावामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती., त्याचा राग मनात धरून कट करून अक्षय भालेराव याचा गाव गुंडांनी बंदोबस्त करून कट कारस्थान रचून आठ ते दहा जणांनी निघून अशी हत्या केली होती. त्याचा निषेध आज जामखेड येथे दिनांक 6 जून 2023 रोजी नोंदवण्यात आला. या निषेधा चे निवेदन आर .पी.आय .जामखेड तालुक्याच्या वतीने तहसीलदार जामखेड व पोलीस स्टेशन जामखेड यांना देण्यात आले. यावेळी जामखेड तालुक्यातील रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आजही माणसाच्या मनामध्ये जाती द्वेष धगधगत आहे . ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिले त्या महापुरुषाची जयंती साजरी करत असताना मनामध्ये जातीय द्वेशाची भावना अनेकांच्या मनात आजही उचंबळून येते., याचे बोंडारा येथील घटनेचे जिवंत उदाहरण आहे. अक्षय भालेराव या तरुणास आठ ते दहा जणांनी बेदम व अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केली.
या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी निषेध व्यक्त केला. तसेच मयताच्या वारसास शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी, आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, कुटुंबाला संरक्षण मिळावे ,सदरचा खटला हा जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा अशा विविध मागण्याचे निवेदन शासनास सादर करण्यात आले.
या गुन्ह्यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक आरोपी आजही फरार आहे. तसेच ज्यांनी कोणी कटकारस्थान केले त्याच्यावरही कलम 120 प्रमाणे दोन जाती मध्ये जातीय तेढ निर्माण करणे याप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली असून पोलिसांचा आरोपीवर धाक राहिलेला दिसत नाही. तसेच दलितावर अत्याचाराचे वाढते प्रमाण दिसत आहे. त्याच्यामुळे आरोपीला कडाक शासन होण्यासाठी पोलिसांनी योग्य भूमिका घेणे अपेक्षित आहे. या गुन्ह्यातील कोणत्याही आरोपीला पाठीशी न घालता त्यांच्यावर कायदेशीर योग्य ती कार्यवाही करून आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी व्यक्त केले.
यावेळी जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, तालुका उपाध्यक्ष सुजित धनवे, वाकी अध्यक्ष बापू जावळे, युवक जिल्हा उपनेते बाबा सोनवणे,रुकासना पठाण ता. अध्यक्ष महिला आघाडी, जामखेड तालुका कार्याध्यक्ष सतीश साळवे,युवराज गायकवाड, शिवाजी आबा साळवे,युवक तालुकाध्यक्ष देवा साळवे , अमोल सोनवणे,अक्षय सदाफुले युवक शहराध्यक्ष, शिवाजी साळवे, सुरेश रंधवे, आकाश सोनवणे, संतोष सोनवणे,विश्वनाथ मोरे शाखाप्रमुख पाटोदा, विजय गायकवाड, सूर्यभान साळवे ग्रा. पं. सदस्य, अंकुश गायकवाड, गंगाराम घोडेस्वार, किशोर ससाणे, विश्वजित भालेराव, रवींद्र साळवे, संदेश समुद्र, सूर्यकांत सदाफुले, गणेश घायतडक, कलावती साळवे, उत्तम साळवे.आदी रिपाईचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या