Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत धावतात मुदत संपलेली वाहने;आरटीओचे दुर्लक्ष..!

——————————————
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-उदगीर येथे MH-55 नंबरचे आर. टी.ओ.कार्यालय सुरु झाल्यामुळे बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागेल तसेच मुदत संपलेल्या वाहनांवर व नंबर नसलेल्या वाहनांवर कारवाई होईल.अशी आशा जनतेला वाटत होती.पण जनतेच्या आशा,अपेक्षा पुर्णत: धुळीस मिळाल्या आहेत. आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हाळी-हंडरगुळीत बिनधास्तपणे धावत असलेली मुदत संपलेली व नंबर नसलेली वाहने आहेत.तरीही याकडे उदगीरचे आरटीओ कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने या दुर्लक्ष करण्यामागे नक्कीच मोठा "गडबड- घोटाळा" असू शकतो..!
विना नंबरच्या गाड्या,बेशिस्तीत धावणा-या व मुदत संपलेल्या गाड्या यांच्यावर कारवाई करण्याचा हक्क/ जबाबदारी असूनही परिवहन विभाग उदगीरचे अधिकारी अशा गाड्यांना  पाठीशी घालत असल्यानेच हाळी ते हंडरगुळी मार्गे मुदत संपलेली,नंबर नसलेली रोज शेकडो लहान - मोठी वाहने धावतात.आणि असल्या गाड्यांचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण?उदगीरचे परिवहन कार्यालय,पोलीस प्रशासन.असा प्रश्न सजग नागरीकातून उपस्थित होतोय.  उदगीरचे आरटीओ हे अमूक जागी तथा रोडवर थांबून वाहनांची कसून तपासणी करत असल्याचे कधीमधी कानावर येते.पण उदगीर-अहमदपुर राज्यमार्गावर असलेल्या हंडरगुळी आठवडी बाजारच्या गावात आजवर कधी आल्याचे व तपासणी करुन दोषी आढळलेल्या गाड्यांवर R.T.O साहेबांनी कारवाईचे धाडस दाखवले असे अद्यापही ऐकण्यात आले नाही.  उदगीरच्या आरटीओ खात्याच्या "डरपोक" पणामुळे कागदपञ नसलेले,नंबर नसलेले,मुदत संपलेले ट्रक,टेंम्पो,ट्रॅक्टर,बाईक,टमटम असे  रोज शेकडो वाहने बिनधास्तपणे या  मार्गावर धावताना दिसतात.आणि या असल्या गाड्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण,परिवहन खाते,का पोलीस खाते..? 
*चोरीची वाहने सापडू शकतात!*
परिवहन नियमानुसार कोणतीही गाडी खरेदी केल्यानंतर ठरावीक कालावधीत नंबर प्लेट मिळतो.अण्  तो नंबर प्लेट लावणे बंधनकारकच आहे.तरीही येथे शेकडो गाड्या नंबर प्लेट नसलेल्या धावताना दिसतात.ते पण कित्येक महिण्यापासून यामुळे विना नंबरच्या गाड्या चोरीच्या पण असू शकतात !  आणि आरटीओंनी जराशी "डेअरींग" दाखविणे गरजेचे आहे.म्हणजे चोरीच्या गाड्या सापडू शकतात.अशी कुजबूज हाळी मध्ये सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या