चित्रा न्युज प्रतिनिधी
राजापूर - दि. १५ मे २०२५ रोजी दारक सुबोध मधुकर जाधव (शेजवलकर) व दारिका अस्मिता नारायण जाधव (हसोळकर) यांच्या मंगल परिणयाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाक्षरी मोहीम नवविवाहित वधु-वरांच्या हस्ते सुरुवात करत राबविण्यात आली.
यावेळी नव दाम्पत्यांनी स्वाक्षरी करून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. या मोहिमेत राजापूर तालुका बौद्धजन संघ , शेजवली आणि हसोळ भावकी तसेच उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
0 टिप्पण्या