बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :खेडदिगर ते आंबापूर रस्त्याच्या कामांत गेली ७ महिने ठेकेदाराचा मनमानी कारभार बंद करा,रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा,रस्त्याचे दर्जेदार काम करा,रस्त्यांचे निष्कृष्ट काम बंद करा,अशा मागण्यांसाठी खेडदिगर, बिलाडी तह,मुबारकपूर, गणोर, बहिरपूर, खरगोन, आडगाव, आंबापूर येथील सरपंच व गांवक-यांनी खेडदिगर ते आंबापूर येथील रस्त्यावर खेडदिगर खेतिया फाट्याजवळ दिनांक १४ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू व अनेक लोक जखमी झाले.
ठेकेदार की मनमानी नही चलेगी, करा,रस्त्याचे दर्जेदार काम झालेच पाहिजे,खेडदिगर ते आंबापूर रस्त्याचे काम झालेच पाहिजे,या बांधकाम विभागाचे करायचे काय, अशा जोरदार घोषणा आंदोलन कर्त्यांनी दिल्या.या आंदोलनात गणोर, खरगोन,मुबारकपुर आडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,गणोरचे लोकनियुक्त सरपंच राहूल रावताळे,
देवसिग निकुम,अनिल रावताळे, राहूल रावताळे भारत अहेर जितू रावताळे ,देवा पवार,कैलास ठाकरे,अनिल जाधव,संजय खर्डे, तुळशीराम भोसले, नारायण भोसले, सागर रावताळे, अंबरसिंग रावताळे, प्रेमचंद रावताळे गणपत पावरा ,अंजली रावताळे, जायली निकुंम आदि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेत.
उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांचे लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.५ ते ७ महिन्यापूर्वीच या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते.ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम बंद होते.ठेकेदाराकडून योग्य रितीने व चांगले पद्धतीने काम करून घेण्यात येईल व कोणतेही दुर्लक्ष व दिरंगाई होणार नाही,याबाबत काळजी घेण्यात येईल. असे बांधकाम विभागाकडून लेखी पत्र आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
0 टिप्पण्या