चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ग्रामपंचायतचे भद्रावती नगर परिषदेत विलिनीकरण झालेल्या मूळ गवराळा गावाचा वॉर्ड झाला या वॉर्डातून अनेक नगरसेवक तसेच नगराध्यक्ष सुद्धा झालेत मात्र ५ सप्टेंबर २०२३ पासून लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुरू झाला आणि इथूनच या वार्डातील समस्येचा आलेख वाढत गेला. अनेकदा विनंती निवेदन तक्रार करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने शेवटी वैतागून दिनांक.१८ रोज बुधवारला सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा तक्रारीचे निवेदन उपमुख्याधिकारी श्री. जांभूळकर यांना देण्यात आले. निवेदनातून वार्डातील स्मशान भूमी इथे शव दाहिनी व शेड दुरुस्ती करण्यात यावी अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉईंट पर्यंतचे खड्डे बुजविण्यात यावे, स्वराज नगर येथील दयनीय मार्गाची दुरुस्ती व गणेश मंदिर परिसरात असणारे जीवघेणे खड्डे बुजवून, या मार्गावरील अवजड वाहतुकीस लगाम घालण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
समस्या निकाली न काढता एखादी अप्रिय घटना वा जीवितहानी झाल्यास याला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल अशी भूमिका घेत नगर परिषद प्रशासना विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन सादर करताना शिंदे गट शिवसेना उप शहर प्रमुख मनीष बूच्चे, वार्डातील अमर सावनकर, राहुल घोरुडे, वैभव निंबाळकर, अनिल ढेंगळे, मंगेश येरमे जेष्ठ नागरिक पांडुरंग कोयचाडे, प्रभाकर निमकर, सूर्यभान परचाके, बंडू परचाके, नामदेव घाटे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या