चित्रा न्युज प्रतिनिधी
चिंचवड ता.१७-" कुटुंबाची आणि देशाची प्रगती" साध्य करायची असेल तर जास्तीत जास्त शिक्षणाचा अंगीकार मुलींनी केला पाहिजे असे प्रतिपादन श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव राजेंद्रजी मुथा यांनी सोमवारी (ता.१६) केले. ते सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशित झालेल्या नवगतांच्या उत्साह समारंभात बोलत होते. यावेळी संस्थेचे सहसचिव अनिलकुमारजी कांकरिया, सदस्य प्रकाशचंदजी बंब ,माजी विद्यार्थी नंदकुमार पेरकर, संस्थेचे व्यवस्थापक श्री सतीश भारती, प्रशालेच्या प्राचार्या सौ. सारंगा भारती, उपमुख्याध्यापिका सौ. सुषमा बंब , शिक्षक प्रतिनिधी सौ.मनीषा पारधी , श्री. हरीश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व स्वर्गीय माननीय ताराबाई शंकरलाल मुथा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नवकार मंत्राचे सामुदायिक पठन करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा सुशोभित करण्यात आली होती . इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींचे औक्षण करून व त्यांना उपस्थितांच्या हस्ते गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या प्राचार्या सौ. भारती यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेची उज्वल परंपरा, शाळेकडून विद्यार्थीनींवर करण्यात येणारे संस्कार व स्वच्छतेचे महत्व सांगून आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना विद्यार्थिनींना दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा लोखंडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक दिपक थोरात यांनी मानले.
0 टिप्पण्या