रूढी आणि परंपरेला फाटा देत भर पावसात पाटील परिवाराने पार पडला अंत्यसंस्कार .
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :- भारतीय रेल्वे विभागात कार्यरत इंजिनीयर राजेश देविदास पाटील यांचे कर्तव्यावर असताना वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात आई कौशल्या पाटील, पत्नी मनीषा रा .पाटील,मुले अरिहंती व अर्हत पाटील,भाऊ प्रमोद,विनोद व प्रफुल पाटील,आणि माजी नायब तहसीलदार भगवान वनकर आणि कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कोणतेही कर्मकांड ,रुढी, परंपरेला फाटा देत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्यांच्या अस्थी वाहत्या पाण्यात विसर्जित न करता त्या अस्थी स्थानिक बुद्ध टेकडीवर दोन खड्डे करून त्यामध्ये अस्थी आणि राख पुरून बोधी वृक्ष व बकुळ वृक्षाचे रोपण करून पर्यावरणपूरक कृतिशील आदरांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी माजी नायब तहसीलदार भगवान वनकर यांचे अध्यक्षतेखाली आदरांजली सभा घेण्यात आली. प्रारंभी वंदना विशेष कार्यकारी अधिकारी राजूभाऊ थुल यांनी घेतली. विविध मान्यवरांनी व कुटुंबीयांनी आपले आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले. या सभेचे सूत्रसंचालन सुनील ढाले यांनी केले.यावेळी शाक्य संघ बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, बुद्ध टेकडीचे सदस्य प्रणोज बनकर , दिनेश वाणी, सचिन धोंगडे कुटुंबातील पुष्पा पाटील, मीनाक्षी पाटील,सीमा पाटील,कुमुद वनकर,मोहनीश पाटील,विभा पाटील ,आकांक्षा वनकर,साहस वनकर ,अनिल कांबळे, विजय नगराळे,अभय बागडे,दीपचंद कांबळे,जयंत फुलझेले,किरण कांबळे, सचिन कांबळे,योगीराज फुलझेले,रजत भगत,विकास आटे, राजकुमार पाटील इ कुटुंबीय , आप्तसकीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. . या प्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने बुद्धा टेकडी विकासासाठी नऊ हजार चे धम्मदान प्राप्त झाले.


0 टिप्पण्या