चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : खरेदी विक्रीच्या प्लाटचे फेरफार साठी १/१/ २०२६ मध्ये शुभम मोरे यांनी तलाठी गवराळा भद्रावती यांचे कडे अर्ज करतो. आणि तलाठी फेरफार न घेता दिनांक २४/१२/२०२६ रोजी अहवाल तहसीलदार भद्रावती यांना देतो.
जवळपास चाळीस ते पन्नास प्लाट धारकांचे फेरफार नावाने ७/१२ झाला असल्याची माहिती आहे. पण मागील विस वर्षापासुन मोरे यांच्या नावाने फेरफार का? घेत नाही. हा काय प्रकार आहे. असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
यापूर्वी सुद्धा एक शेतकरी मेश्राम यांनी फेरफार साठी तहसील कार्यालय भद्रावती मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
हा काय प्रकार सुरू आहे. महसूल अधिकारी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, हे सर्व नोंदणी अधिकारी आहेत, न्यायाधीश नाहीत. विक्रीला आवाहन करणे हे फक्त आणि फक्त दिवाणी न्यायाधीश यांनाच आहे.
विनाकारण शेतकऱ्यांना व प्लाट धारकांना महसूल अधिकारी यांनी मनस्ताप देऊ नये.
विनोद खोब्रागडे तत्कालीन पटवारी, तलाठी, बरांज मोकासा तालुका भद्रावती तथा सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर, यांच्या रोखठोक सवाल.


0 टिप्पण्या