भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
*जाहिरात*
काजू बदाम सोडून आता
गुटखा प्रसिद्ध झाला
अजय, अक्षय, शाहरूख सुद्धा
विमलच खा म्हणाला
बंद झाल्या शिक्षण जाहिराती
जुगार प्रसिद्ध झाला
हिंदी मराठी कलाकार सुद्धा
रमीच खेळा म्हणाला
बंद झालेत मैदानी खेळ
मोबाईल वेडा झाला
भर त्यात आय पी एल ची
त्यातही जुगार आला
ख्रिस गेल कपिल सुद्धा
केसरच खा म्हणाला
पामोलीव्ह का जबाब नही
तो ही विसरून गेला
जॅकी सुद्धा गायछाप खातो
तो ही तेच म्हणाला
गुटख्या मुळेच धारीवाल सुद्धा
इतका श्रीमंत झाला
जुगार, दारू, सिग्रेट, गुटखा
इतका प्रसिद्ध झाला
कुणीच नाही म्हणत याला
तुम्ही आळा घाला
बरबाद होत आहे तरुण पिढी
समाज व्यसनी झाला
नाचवतो आणून गौतमी पाटील
तरीही नेताच महान झाला
शाहू, फुले,आंबेडकर आता
फक्त भाषणात घाला
शिव छत्रपती मात्र पाहिजेत यांना
शेजारीच जन्माला यायला
नेते सुद्धा हेच म्हणतात
द्वेष जन्माला घाला
म्हणुनच यांनी सर्व भाषणात
जातीय उल्लेख केला
चौका चौकात जयंती साजरी
त्यात मोठा डीजे आला
धुंद होऊन सामील सगळेच
आचार विचार संपून गेला
विनंती करतोय एक तुम्हाला
स्वतःलाच बंधने घाला
त्यांच्या होतात जाहिराती आणी
समाज बरबाद झाला
..... एक भारतीय. 🙏


0 टिप्पण्या