चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : काल मुंबईत संवाद दौ-याचा पहिला टप्पा संपन्न झाला. विदर्भानंतर मुंबईत संवाद दौरा होता. बौद्ध बांधवांनी याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. लवकरच मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र आणि नवी मुंबई, ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा बौद्ध समाज संवाद दौरा सुरू होईल.
मुंबईकरानी दिलेल्या सहकार्य आणि सहभागा बद्दल आभारी आहोत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने यांनी व्यक्त केले.
काल मुंबईत बौद्ध संवाद दौऱ्याची समारोपीय सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
तसेच बौद्ध संवाद दौऱ्यांचे आयोजक टीम मधील
राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, भारतीय बौद्ध महासभेचे यु जी बोराडे, विलास वानखेडे, दयानंद वडेकर यांनीही आभार मानले.
0 टिप्पण्या