Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड विष्णू पुरी धरणातील पाणीसाठा फारचं कमी प्रमाणात शिल्लक,पाच ते सहा दिवसाला नळाला पाणी, गंभीर समस्या,,,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -उन्हाळा सुरू ही झाला नाही,उन्हाचा पारा चढला ही नाही नांदेड करांना पाच ते सहा दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे,असा सूर जनतेतून निघतो आहे, आता तर कूठे उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाची तीव्रता वाढत आहे पुढे तर लंका बाकी आहे असा गंभीर प्रश्न पहिलें कधी निर्माण झाला नाही तो आज निर्माण झाला 
पाण्यामध्ये गाळाचे प्रमाण वरचेवर वाढत आहे आणि वाळू उपसा प्रचंड प्रमाणात होत आहे, त्यामुळे गाळ साचून पाणी मृत साठ्यात जमा होत आहे आणि आता पुढें जसं जसी उन्हाची तीव्रता वाढेल तस पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी मृत साठ्यात जमा होईल आणि सरकारला दुसर्या धरणातील पाणी विष्णू पुरी धरणात सोडून घ्यावं लागेल तेव्हा कुठे आठवड्यात एकदा पाणी जनतेला भेटेल 
या कडे महापालिका व स्थानिक प्रतिनिधी यांनी आता पासून च लक्ष देणें गरजेचे आहे परंतु या वेळेसचा तापमानाचा अंदाज पाहता नांदेड करांना पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नांदेड च्या काही ईलाक्यामधे गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे,तरी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त यांनी वेळीच लक्ष देऊन पुढील गंभीर समस्या निर्माण होऊ न देता जनतेचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी जनतेने केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या