चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यात,जिल्ह्यात व राज्यात नव्हे तर भारत देशातील आन्ध्रप्रदेश,यु.पी बिहार,कर्नाटक,तेलंगणा,मध्यप्रदेश, दिल्ली,पंजाब आदी राज्यात प्रसिध्द असलेला गुरांचा बाजार हंडरगुळी ता.उदगीर येथे भरतो.तसेच उदगीर नंतर तालुक्यात सर्वात मोठी बाजार पेठ व राज्यमार्गालगत असलेल्या हाळी-हंडरगुळी या दोन गावाची बाजारचे गाव अशी असलेली प्रसिध्दी/ओळख पुसुन "घाणीचे व दुर्गंधीचे गाव म्हणजे हाळीहंडरगुळी" ही नवी प्रसिध्दी/ओळख मिळाली.
कारण,राज्यमार्गावर व बांधकाम खात्याच्या जागेवर असलेल्या अवैध माॅंस,मटन विक्रेत्यांमुळे बसस्थानक व परिसरात घाणवास,दुर्घंधी पसरते. व हा घाणवास येताच हाळी आले बघा,असे वाहक-चालक व प्रवाशी म्हणतात.म्हणुन पुर्वी असलेली ओळख पुसून आता घाणीचे गाव ! ही नवी ओळख हाळी-हंडरगुळीला मिळाली आहे.तरीही याचे येथील गाव पुढा-यांना व गावातील डिजीटल हिरोंना {युवकांना} सुख ना दु:ख तसेच देणे-घेणे ही नाही.म्हणुन तर अगदी राज्यमार्गावर तसेच सा. बांधकाम खात्याच्या जागेवर आणि विशेष म्हणजे जि.प. केंद्रीय प्राथ. शाळे जवळच खुलेआमपणे माॅंस / मटन विक्री होत आहे.आणि रोडवर तसेच तिरु नदीपाञात माॅंस,मटन, हाडं,रक्त व पंखं हे वेस्टेच साहित्य टाकत आहेत.यामुळे परिसरात सर्वदुर घाण वास पसरतो.व यामुळे नदीचे व हाळी-हंडरगुळी या 2 गावाचे वैभव, सौंदर्य व पाविञ्य धोक्यात आल्याचे दिसते.तसेच सामाजिक वातावरण ही धोक्यात आले आहे. येथील अवैध माॅंस विक्री व त्यांचे अतिक्रमण कायमचे हटवावे, अशी येथील जनतेची इच्छा आहे. म्हणुन याविरुध्द अनेकवेळा आवाज उठवला.तरीही याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष दिले नाही.म्हणुन आता राज्य शासनाचे बांधकाम मंञी असलेले व छञपती घराण्याचे वंशज असलेले शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले हे हाळी- हंडरगुळीकरांची इच्छा/अपेक्षा पुर्ण करतील का? याकडे लक्ष लागले आहे.
कारण,आजकाल पानटपरीवाल्यांना ही परवाना काढावा लागत आहे.अन् येथील माॅंस,मटन विक्रेते हे परवाना नसतानाही बांधकाम खात्याच्या राज्यमार्गावर तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथ.शाळेजवळच माॅंस,मटन विक्री करतातच कशी? व कुणाच्या आर्शिवादाने? तसेच याबाबत युवक मंडळी गप्प का? डी.जे. समोर कंबर हलवायचे काम करणारे युवक मंडळी हे जनहिताचे काम कधी करणार? असे प्रश्न हंडरगुळीकरातून चर्चीले जात आहेत.
0 टिप्पण्या