चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : सध्या सर्वत्र रेल्वे विभागाकडून तिसरी रेल्वेलाइन टाकण्याचे काम सुरु आहे.भद्रावतीतही ते सुरु आहे.यासाठी भांदक रेल्वे स्थानकात नव्या लुप लाइन टाकण्यात आल्याने स्थानकाचा विस्तार वाढला आहे त्यामुळे जुना ओव्हरब्रीज तोकडा पडला आहे.त्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना पलीकडच्या प्लाटफार्मवर जाण्यासाठी लुपलाइनवर उभ्या असलेल्या गाडीखालून जावे लागते किंवा संपूर्ण गाडीला वळसा घालून प्लॅटफॉर्म गाठावा लागत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे आधी ओव्हरब्रीज तयार करावा किंवा लुपलाइनवर आडवी गाडी राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील रेल्वेप्रवाशी करीत आहे.तिसऱ्या लाइनसाठी रेल्वेस्थानकावर लुपलाइनच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म वाढविण्यात आले आहे. या लुपलाइनवर नेहमी मालगाड्या उभ्या असतात त्यामुळे पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना अडथळा येते.एक तर समोर उभ्या असलेल्या गाडीखालुन पलीकडे जाणे किंवा उभ्या असलेल्या गाडीला संपूर्णपणे वळसा घालुन पलीकडे जाणे हे दोन पर्याय प्रवाशांपुढे असतात मात्र प्रवाशी समोर उभ्या असलेल्या गाडीखालुन पलीकडे जाण्याचा शार्टकट निवडतात हे प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते.मात्र हा जिवघेना खेळ येथे दररोज सुरु असतो.यामुळे एखादा अपघात घडू शकतो.रेल्वे प्रशासनाने आधी ओव्हरब्रीजची लांबी वाढवायला पाहिजे होती.मात्र तसे न केल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जावे लागते.हि गंभीर समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आधी ओव्हरब्रीजचे काम करावे अन्यथा समोरील लाइनवर कोणतिही गाडी ऊभी राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणुसमारे,योगेश ठवकर,बाबा निखाडे, प्रभाकर निमकर, मुनीर भाई, तुकाराम खिरटकर,निलेश साव,बबलू डाफ,बंडू परचाके, सुर्यभान परचाके, पांडुरंग कोयचाडे आदिंनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
0 टिप्पण्या