जाॅंबाज सपोनि.एस.पी.गायकवाड
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील वाढवणा बू. ठाण्याच्या हद्दीत जो कोणी कायदा हातात घेईल,त्याला कायद्याचा हाबाडा देणार आहे.तसेच या बाबतीत कोण पण असेलतर त्याच्या बी.एन.एस.या नुसार कारवाई करणारच.असा स्पष्ट इषारा नुतन सपोनि.एस.पी.गायकवाड यांनी दिला.
त्यांनी हंडरगुळी बीटला नुकतीच भेट दिली असता आमच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणुन हाळी व हंडरगुळी या दोन गावांची सर्वदुर ओळख असलीतरीही कांही टगे सामाजिक शांततेला ठेच लागेल अशा प्रकारचे वर्तन करतात.त्या सर्व टग्यांना व कायदा हातात घेणा-यांना कायद्याचा हाबाडा देणार आणि सद् रक्षणाय,खलनिग्रहनाय.या वाक्या— नुसार वाढवणा पोलिस कार्य करेल. शांतता प्रिय व बंधूभाव जोपासणारा परिसर म्हणुन तालुक्यात हंडरगुळी - हाळी या दोन गावांचा नावलौकीक आहे.आणि तो अबाधित ठेवण्याला प्राधान्य द्या.प्रशासनाला मदत करा, पोलिस हे जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात.आणि ठाण्याची सरहद्द ४३ गावापर्यंत म्हणजे उदगीर,जळकोट, चाकुर,अहमदपुर या ४ तालुक्यात आहे.या पैकी सर्वात मोठे व बाजार पेठेचे तसेच राज्यमार्गावरचे प्रमूख केंद्र असलेल्या या गावात व वाढवना हद्दीत असलेली एकता,शांतता,बंधू प्रेम हे सर्वांनीच यापूढे पण कायम ठेवावे.तसेच जो कोणी कायद्याविरुद जाऊन कायद्याला चॅलेंज देत असेल तर त्यांची माहिती पोलिसांना द्या, कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कायद्याचा हाबाडा देणारच. असा इषारा नुतन जाॅंबाज सपोनि.सुनिल पी. गायकवाड यांनी दिव्य मराठी जवळ बोलताना दिली आहे.
0 टिप्पण्या