सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे नर्सिंग,फार्मसी व पॉलिटेक्निक या चारही कॉलेजसाठी एकच इमारत व तीच जमीन दाखवून कॉलेजला मंजुरी मिळविताना खोटे व बनावट कागदपत्र तसेच कागदोपत्री कर्मचारी दाखवून तपासणी कमिटीला मोठ्या प्रमाणावर लाच देऊन शासनाची फसवणूक करून एकाच इमारतीत वेगवेगळ्या कॉलेजला मंजुरी मिळविलेल्या आहेत. तसेच विध्यार्थ्यांना फक्त कागदोपत्री प्रवेश देऊन त्यांची शिष्यवृत्ती लाटण्याचा कार्यक्रम चालू आहे. येथे एकही शिक्षक उपलब्ध नसून फक्त कॉलेज तपासणीच्या वेळी कागदोपत्री शिक्षक दाखविले जातात. त्यामुळे डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर दिनांक ११/०७/२०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.
श्री.सुनिल साळवे यांनी तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे एकाच इमारतीत एएनएम/जीएनएम, बी.एस्सी नर्सिंग,डी.फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेज चालविले जात असून शासनाच्या व विद्यापीठाच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केलेले आहे. कॉलेजसाठी लागणारा कर्मचारी वर्ग हा कागदोपत्री आहे.प्रत्येक कॉलेजसाठी दाखविलेले ‘प्राचार्य’ हे सुद्धा त्यापदासाठी पात्र नसून त्यांचे खोटे व बनावट कागदपत्र व प्रतिज्ञापत्र तयार करून वेगवेगळ्या तपासणी समित्यांना मोठ्या प्रमाणावर लाच देऊन डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी व संबंधित कागदोपत्री काम करणाऱ्या प्राचार्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे संबंधित विद्यापीठामार्फत सर्व कॉलेजच्या एकाच दिवशी तपासण्या करून कॉलेज व संस्थेचे विश्वस्थ यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येऊ नये. तसेच मागील शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे तात्काळ इतर कॉलेजला समायोजन करून स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केली आहे. संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे एकाच इमारतीत अवैधरित्या चालविले जाणारे कॉलेज १) डॉ.पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग(बी एस्सी) साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर(कॉलेज कोड ९४४०),२) डॉ. पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग(जीएनए) साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर(कॉलेज कोड १६०५),३) इंदिरा इन्स्टिटयूट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर(कॉलेज कोड ०५६५६),४) इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर.
विद्यार्थी हित,शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता तसेच समाजहित डोळ्यासमोर ठेऊन तालुका न्याय दंडाधिकारी म्हणून आदेश देऊन डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, संस्थेमार्फत एकाच इमारतीत एएनएम,जीएनएम,बी.एस्सी नर्सिंग,डी. फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेजच्या एकाच दिवशी संबंधित विद्यापीठामार्फत तपासण्या करून कारवाई करून कॉलेजची शासन मान्यता व विद्यापीठाचे संलग्नीकरण रद्द करण्यात यावे व तो पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांचे इतर कॉलेजला स्थलांतर करण्यात यावे. तसेच डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर दिनांक ११/०७/२०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.
चौकट :- “डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी इंदिरा हॉस्पिटल जामखेड येथे शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत देखील करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. त्या भ्रष्टचाराच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशातून साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे चेतना सेवाभावी संस्था लातूर या संस्थेच्या माध्यमातून अवैध संपत्ती घेतली आहे. डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच इमारतीत अनेक कॉलेजला मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निर्माण केलेल्या मालमत्ता शासन जमा करण्यात यावी अशी मागणीही श्री. सुनील साळवे यांनी केली आहे”.
फोटो कॅप्शन:-डॉ.सुहास सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सूर्यवंशी यांनी इंदिरा नर्सिंग,फार्मसी व पॉलिटेक्निक कॉलेज साकत तालुका जामखेडला एकाच इमारतीत बनावट कागदपत्र व कागदोपत्री कर्मचारी दाखवून शासनाची फसवणूक करून मंजुरी मिळविल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनील साळवे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या