चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर:- शहरातील किलबिल संस्थेच्या संस्थापिका तथा समाजसेविका प्रा. प्रभाताई मुठाळ यांना सन २०२६ चा “हिराई सन्मान पुरस्कार” देऊन आज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
ज्या आईने रस्त्यावरच्या लहान अनाथ मुलांना आपलेसे करून त्यांना घर, माया आणि उज्ज्वल भविष्य दिले, अशा या मातृस्वरूप व्यक्तिमत्त्वाचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या निःस्वार्थ कार्याची पावती आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झालेला असल्याचे मनोगत महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या