रोहिणी रणदिवे साकोली तालुका प्रतिनिधि मो. न:-9356821592
साकोली : राज्यातील शेतकरी विरोधी भाजप सरकारने यंदा उन्हाळी धान खरेदी तसेच मका पिकांची खरेदी अद्यापही सुरू न केल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना अल्प दरात धान व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या घरात भान विक्रीकरिता उपलब्ध असून आधारभूत केंद्र अभावी खाजगी 1500 ते 1600 रुपये दराने विकला जात आहे मका पिकाची नोंदणी होऊन विक्रेता प्रतीक्षा कायम आहे.
व्यापाऱ्यांकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे, तेव्हा धान व मका पिकांची आधारभूत खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे अन्यथा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यभर वतीने ठिकठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. एक प्रकारे त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
महाविकास सकाळी सरकारच्या काळात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवून देण्यात आलेली होती, त्यामुळे शेतकरी हा व्यापाऱ्यांच्या दारात न भटकता सरळ आधारभूत धान खरेदी केंद्रात धान विक्रीकरिता घेऊन जात असे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात धान खरेदी केंद्र सुरू होऊन सुद्धा भाजपचे नेते बोंबा मारायचे, आता जिल्ह्यातील भाजपचे नेते गप्प का आहेत याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले.
१ मे धान खरेदीचा मुहूर्त सरकारने साधला नाही, त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांकडे धान विक्रीकरिता उपलब्ध असला तरी अद्यापही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खाजगी अल्प दराने ध्यान विकला जात आहे तसेच मका पिकाची नोंदणी होऊन ती सुद्धा विक्री करिता प्रतीक्षेत आहे. तेव्हा जिल्हा पणन कार्यालयासह जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ आधारभूत धान खरेदी व मका खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा धोरण अवलंबलं गेलं होतं. शेतकऱ्यांच्या संकटात आघाडी सरकारने सहभागी होऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचे काम केले मात्र सध्या राज्यातील सरकार शेतकरी विरोधी धोरण अवलंबत असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार नाना पटोले यांनी केला आहे. सध्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाची अंतिम कापणी होऊन मळणी सुरू झालेली आहे अशा वेळी तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे केंद्र तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्या कडे तात्काळ लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना मदत करावे असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या